उतारा नीट वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
शाळेची घंटा झाली. गुरुजी वर्गात आले. आदल्या दिवशी गुरुजींनी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते. वर्गात आल्याबरोबर गुरुजींनी मुलांच्या पाट्या बघायला सुरुवात केली. गुरुजींनी घातलेले गणित फार अवघड होते. त्यामुळे बहुतेक मुलांच्या पाट्या कोऱ्या होत्या. चारपाच मुलांनीच ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना ते सोडवता आले नव्हते. त्यांची उत्तरे चुकली होती. एका मुलाने मात्र ते अवघड गणित बरोबर सोडवले होते. त्या मुलाची पाटी पाहून गुरुजींना फार आनंद झाला. हातातली पाटी सर्व मुलांना दाखवत ते म्हणाले, “पहा, गोपाळने गणित बरोबर सोडवले आहे. आपल्या या वर्गातील सर्व मुलांत तो लहान आहे; पण सर्वांपेक्षा तो हुशार आहे.' असे म्हणून गुरुजींनी ती पाटी गोपाळच्या हाती दिली आणि त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, “शाबास ! गोपाळ, शाबास !
मुलाची पाटी पाहून गुरुजींना आनंद का झाला?
Share
Verified answer
Explanation:
आदल्या दिवशी गुरुजींनी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते. वर्गात आल्याबरोबर गुरुजींनी मुलांच्या पाट्या बघायला सुरुवात केली. गुरुजींनी घातलेले गणित फार अवघड होते. त्यामुळे बहुतेक मुलांच्या पाट्या कोऱ्या होत्या. चारपाच मुलांनीच ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना ते सोडवता आले नव्हते. त्यांची उत्तरे चुकली होती. एका मुलाने मात्र ते अवघड गणित बरोबर सोडवले होते. त्या मुलाची पाटी पाहून गुरुजींना फार आनंद झाला.