मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम 100 ते 120 शब्दात लिहा expand ur thoughts
Share
मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम 100 ते 120 शब्दात लिहा expand ur thoughts
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
मोबाइल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote) >> मोबाईल ही आता आपली गरजेची वस्तु बनलेली आहे । पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाइल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।
अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे । आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनला आहे । मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।
कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टर कडे नंबर लावण्यासाठी,पैसे पाठवण्यासाठी किंवा जेवण मागवण्यासाठी आता मोबाइल च लागतो ।
आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या मोबाइल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया ।
Explanation:
मोबाइल चे फायदे
१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।
)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।
३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।
४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।
५) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता । मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत किंवा मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो ।
यांसारखे अनेक मोबाइल चे फायदे असले तरी देखील ह्या आपल्या आवडीच्या उपकरणाचे तोटे / दुष्परिणाम देखील आहेत ।
मोबाइल चे तोटे / दुष्परिणाम
१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे । पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत । हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे ।
२) शाळा कॉलेज मधील मुले मोबाईल चा गैरवापर करताना पाहायला मिळते । मुले शाळेत तासाला बसून मोबाईल चा वापर करतात । ह्या मुळे मुलां मध्ये आत्मकेंद्री पणा वाढताना दिसत आहे ।
३) मोबाईल मुळे वेळेचा अपव्यय होतो । सरकारी कर्मचारी म्हणा किंवा खाजगी कर्मचारी हल्ली सगळ्याच लोकांकडे मोबाईल असतो हे लोक कामाच्या ठिकाणी मोबाईल वर टाईमपास करताना पाहायला मिळतात ।अशा कार्यालयात मोबाईल बंदी गरजेची आहे ।
४) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते । अनेक लोकांना गाडी लावताना मान वाकडी करून मोबाईल वर बोलण्याची सवय असते अशा सवयी मुळे ही लोक स्वतः बरोबरच समाजातील इतर लोकांच्या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात ।
५) बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंग ला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्यांचा विस्फोट होऊ शकतो आणि वापरकर्त्यास मोठी ईजा होऊ शकते । त्यामुळे अशा पद्धतीने मोबाईल वापरणे शक्यतो टाळावे ।
Answer:
yes why not sure we can be frnds btw do u use ins ta gram ??